HW News Marathi
महाराष्ट्र

नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे असल्याचे यांनी म्हटले असते- धनंजय मुंडे

कोल्हापुर | शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा हे भाजपवाले करु लागले आहेत.स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता.परंतु ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपवाले करत आहेत.नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते अशी जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरीच्या जाहीर सभेत संघपरिवारावर केली.
अरे किती महापुरुषांचा अपमान कराल.किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान…त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
सत्तेत असलेल्या भाजपवाल्यांची ट्रिपल तलाक,सबसिडी यावर चर्चा करतात परंतु या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.
इतिहास घडवलेल्या मातीत मी पहिल्यांदा आलो आहे. या मातीत लढाईचे स्फुरण आहे. १६ व्या शतकात नेसरीने जो इतिहास घडवला तोच परिवर्तनाचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या हल्लाबोलच्या माध्यमातून घडवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंद…बंद…बंद…महाराष्ट्र बंद – 5 जूनला शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक

News Desk

बॉलिवूड अभिनेत्री ते राजकारण, उर्मिला मातोंडकर यांचा प्रवास…

News Desk

महाराष्ट्रातील ‘या’ सहा महिलांना मिळणार ‘नारी शक्ती’ पुरस्कार

News Desk