HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे

राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे. पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन देणारे सरकार पारदर्शक कारभार करत असल्याचे धाडस करताना दिसत नाही असा आरोप विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला.
फडणवीस सरकारने साडेतीन वर्षात दोन हजाराच्यावर घोषणा आणि आश्वासने दिली आहेत. घोषणा करणे व काम करणे यामध्ये सरकारच्या कामात खूप फरक आहे आहे असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनी आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहणाऱ्या जनतेचे आभारही मानले.
सभेत आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर,आमदार हसन मुश्रीफ यांनीही आपले विचार मांडले. सभेनंतर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाचे दर्शन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,जयंत पाटील,दिलीप वळसेपाटील यांनी घेतले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, आमदार श्रीमती संध्या कुपेकर, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंदा बाभुळकर आदींसह चंदगड, आजरा, गडहिग्लज यातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ए.सीचा वापर न करता नैसर्गिक हवा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

News Desk

पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे, पाटलांचा ठाकरेंना सल्ला

News Desk