HW News Marathi
मुंबई

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

मुंबई | ‘कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मुलांना सीबीएसईच्या फेरपरीक्षेला बसवू नका,’ असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील पालकांना केले आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्च तर बारावीचा २७ मार्चला घेण्यात आला होता. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी दोन्ही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा विचार बोर्डाने घेतला आहे.

सीबीएसईने बारावी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकादा २५ एप्रिल होणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. हा पेपर फक्त दिल्ली आणि हरियाणात होणार आहे. सीबीएसईचा दहावी पेपर फुटीप्रकरणात पोलिस तापस सुरू असून येत्या १५ दिवसात फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही, असे स्पष्टीकरण मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले आहे.

‘सीबीएसई परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच फुटला. हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वत:ची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात? सरकारला जर गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांना काय दोष, त्यांनी पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला का बसायचे?’ असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मनसे कार्यकत्यांकडून चोप

News Desk

बाळासाहेब यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा वाघ आक्रमक…

News Desk

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk