HW News Marathi
मुंबई

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडमुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

मुंबई | नेहमी तांत्रिक बिघाडामुळे मध्य आणि पश्चिम लोकल ट्रेन मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची सवय मुंबईकरांना तर आहे. पण, आता मुंबईकरांना लोकल ट्रेनप्रमाणेच मेट्रो ट्रेनच्या तांत्रिक बिघाड सुध्दा मुंबईकरांना सवय करावी लागणार आहे.

मुंबईकरांना गुरुवारी घाटकोपरहून वर्सोवाच्या दिशने जाणाऱ्या मेट्रोचा एक दरवाजा उघडा राहिल्यामुळे मेट्रो ट्रेन विस्कळीत झाल्याचा प्रत्येय आला. त्यानंतर प्रवाशांना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकावर उतरवण्यात आले.

या तांत्रिक बिघाडामुळे काही वेळेसाठी मेट्रो पुर्णपणे कोलमडील होती. त्यामुळे अंधेरी आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या मेट्रोची वाहतूक सुरु असली तरी त्यांच्या मेट्रोच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोविंदा रे गोपाळा…..

News Desk

उद्धव ने निच राजकारण खेळले ….आता हातवर टाळी नाही तर कानाखाली

News Desk

मुंबईवर ‘अस्मानी’ संकट,खासगी आणि सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर

News Desk
महाराष्ट्र

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव-शरद पवार एकत्र

News Desk

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खूद्द शरद पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या भेटीची राजकीय वतुर्ळात मात्र वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Related posts

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणबंदी घातली तर…राणेंचा सरकारला इशारा !

News Desk

अहमदनगर दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक

swarit

…तर येत्या काळात भाजपचे काॅंग्रेस हाेईल !

News Desk