HW News Marathi
मुंबई

काय कारण | उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत नियोजित बैठक तडकाफडकी रद्द झाली

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार होती. संध्याकाळी 5.45 ची वेळ निश्चित करण्यात आली होती. पण विधानसभेत मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत होते. त्यामुळे ही भेट तासाभराने पुढे ढकलण्यात आली होती.

उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण ही भेट आता रद्द झाली. उद्धव ठाकरे तब्बल अडीच तास वाट पाहुन ‘मातोश्री’वर परतले. बैठकीची वेळ पुन्हा बदलली आणि ती ६:४५ वाजता ठरली. मात्र त्याचवेळी विधान भवनात नारायण राणे आले. त्यांना मुख्यमंत्री तात्काळ भेटले. उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री नारायण राणेंना भेटले ही माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहताच. तात्काळ मातोश्रीकडे रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांसोबत नियोजित बैठक तडकाफडकी रद्द झाली. हे समजताच विधान भवनाच्या मुख्य गेटवर स्वागतासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनमध्ये आणि आमदारांमध्ये आपआपसात चर्चा सुरू झाली. मात्र कुणीही माध्यमांकडे न बोलता सरळ पुन्हा विधान भवनात निघून गेले. या अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे विधान भवनात राजकिय चर्चांना उधाण आलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुण चर्चा केली. आणि नियोजित बैठक रद्द झाल्यामुळे दिलगिरी व्यक्तं केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाणे महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात आंदोलन

News Desk

यंदा कितीही थर लावा; न्यायालयाने निर्बंध हटविले

News Desk

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान

Aprna
देश / विदेश

गोव्याचे माजी काँग्रेस प्रमुख शांताराम नाईक यांचे निधन

News Desk

पणजी | माजी राज्यसभा सदस्य आणि माजी गोवा काँग्रेसचे प्रमुख शांताराम नाईक यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नाईक यांना सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना मडगाव या त्यांच्या घराजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

७३ वर्षीय शांताराम नाईक यांच्या अशा जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रुपाने आम्ही एक मार्गदर्शक गमवला आहे. नाईक यांनी अनेक युवकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी अमुल्य असे मार्गदर्शक केले होते. नाईक यांच्या जाण्याने गोवा काँग्रेसचे मोठ नुकसान झाले असल्याचे गोवा काँग्रेस नेता गिरीश राया यांनी सांगितले.

  • शांताराम यांचा अल्प परिचय

शांताराम नाईक यांनी गोवा काँग्रेस पार्टीच्या वतीने १९८४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. नाईक यांनी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी उचलून धरली होती. नाईक यांच्या पाठपुराव्याने गोव्याला १९८७ वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला. २००५-२०११ आणि २०११-२०१७ या कालावधीत नाईक दोन वेळा राज्यसभा सदस्य देखील झाले आहेत.

Related posts

‘तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता’, राजनाथ सिंह यांनी चिंता दर्शवली

News Desk

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्री पदबाबत आज होणार सुनावणी

News Desk

#NirbhayaCase: चारही दोषींचे चौथ्यांदा डेथ वॉरंड जारी, २० मार्चला फासावर लटकवणार

swarit