HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेतील अंबरनाथ-बदलापूर स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे

मुंबई | वाढत्या तापमानामुळे मुंबईकर हैराण तर झाले आहेत. या उष्णेता फटका रेल्वे रुळाना सुद्धा बसत आहे. अंबरनाथ-बदलापूर या स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कर्जत दिशेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. तब्बल दोन तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर येत आहे.

अंबरनाथ- बदलापूर येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास रेल्वे रुळाला तडे गेल्याचे कळाले. त्यानंतर ताबडतोप मध्य रेल्वेची वाहतूक थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तातडीने रुळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. जवळपास दोन तासानंतर रेल्वे रुळाचे कामपूर्ण झाले.रेल्वे रुळाला तडे गेल्यानंतर लांब पल्याच्या गाड्यांवर यांचा परिणाम झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल ट्रेनमधून ६ वर्षात तब्बल ६० हजार मोबाइल लंपास

News Desk

खड्ड्याने घेतला बाइकपटुचा बळी

News Desk

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk