HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक घोटाळ्याला क्लिन चिट | धनंजय मुंडे

मुंबई | ‘साडेतीन वर्षात इतके घोटाळे झाले आहेत की, प्रत्येक अधिवेशनात आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावात घोटाळे मांडायचे, पुरावे द्यायचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास क्लिन चिट द्याची हिच आता प्रथा आणि परंपरा झाली आहे.’ असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यमंत्र्यांना हॅशटॅग करुन हे विधान केले आहे.

विधानसभेचा हा शेवटचा आठवडा सुरु आहे. या आठवड्यात विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी तूर घोटाळा बदल विधानसभेत बोलत होते. ‘राज्यातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. विक्रीला नंबर लागत नाही, केंद्रावर लाखे नावाचा एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि सरकारच्या यंत्रणेने मागील वर्षीच्या तूर विक्रीत २०० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.’

गेल्या आठड्यात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला वेढीस धरले. या घोटाळ्यात किती उंदीर मारले, त्यांची विल्हेवाट कुठे केली, मंत्रालयात विष आण्यास कोणी परवानगी दिली असे अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकारवर टीका केली. त्यानंतर हा घोटाळ्यावर महाराष्ट्रात यांची चर्चा रंगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालिसा’चा वाद! – बाळासाहेब थोरात

Aprna

अखेर रणजितसिंह देशमुख धनुष्यबाण सोडत पुन्हा कॉंग्रेसचा हात हातात घेणार!

News Desk

शेतकरी संघटनेचा कुठलाही नेता अमित शहांना भेटणार नाही – राजू शेट्टी

News Desk