HW News Marathi
मुंबई

राज्यात ‘कोरोना’चे ४७ नवीन रूग्ण आढळल्याने ‘टेन्शन’ वाढले

मुंबई | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तासागणिक वाढताना दिसत आहे. सद्यस्थितीला भारतात हा आकडा २००० च्या पुढे गेला असून महाराष्ट्रात हा आकडा आता ५०० च्या पुढे जात ५३७ झाला आहे. काल (३ एप्रिल) सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची देशातील संख्या ६८ वर पोहचली आहे.कोरोनाची लागण झाल्याची चाचणी करण्यासाठी गेल्या २४ तासांत देशात ८ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. दरम्यान, काल (३ एप्रिल) एका दिवसांत राज्यात ६७ रोपोना पॉझिटिव्ह झाले होते. तर आज (४ एप्रिल) ४७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यात चिंतेचे वातावरण अधिक निर्माण झाले आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्याच कार्यकर्त्यांच्या दुकानांवर इंग्रजी पाट्या

News Desk

कासकरच्या हस्तकांनी खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

News Desk

राणीबागेसाठी पेंग्विनचा पायगुण शुभ

News Desk