HW News Marathi
राजकारण

‘सोशल मीडीयाचा वापर करुन भाजपची सत्ता उलथवून टाकू’ – हार्दिक पटेल

मुंबई | सोशल मीडीयाचा योग्य पद्धतीने वापर करुन भाजपची सत्ता उलथवून टाकू शकतो असे मत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी मांडले. कारण एखादा संदेश १५ सेकेंदात २५ लाख लोकांपर्यंत सहज पोहचू शकतो. पण, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप यांचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.

या मीडीयाच्या माध्यमातून खूप मोठी चळवळ उभी राहू शकते. व्हॉट्सअप हे ट्विटरपेक्षा प्रभावी आणि शक्तीशाली माध्यम आहे. या माध्यमाच्या वापराने लोकांमध्ये जागृती व उठाव करुन भाजपाची सत्ता पाडवू शकतो.

मुंबई काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागातील पथकाशी संवाद साधण्यासाठी मुंबईला आले होते. सोशल मीडीयावर भरपूर जास्त पैसे खर्च केल्यामुळे देशाचे पंतप्रधान झाले. याच माध्यमाचा वापर करुन मोदींची सत्ता पाडता येऊ शकते, असे हार्दिकने म्हटले. या कार्यक्रमाच्या काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

News Desk

पवारांची मुलाखत चोरूनही पाहिली नाही – उद्धव ठाकरे

News Desk

राफेल घोटाळ्याबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये, काँग्रेसचा आरोप

News Desk