HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही!

वर्धा | लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केली आहे. तर इतर ५ जणांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. वर्ध्यात काल (१४ जुलै) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदी निवडीवरून काँग्रेसवर टीका केली.

वर्धा येथील सेलूमधील नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन आणि वर्ध्यात नवीन बसस्थानकाचं लोकार्पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “काँग्रेसचे इंजिन खराब झाले आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही.”

मुनगंटीवार पुढे असे देखील म्हणाले की, काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न बघितली, तरी त्यांच हेकाही क्षणच त्यांना आनंद देऊ शकते. गेल्या ४७ वर्षांत काँग्रेसने कोणतीही विकासकामे केली नाहीत. जनतेने हे जाणले आहे. त्यामुळे काँग्रेस आता पुढे जाऊ शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात १०० रुपयांत १० वर्षे वायफाय!

News Desk

कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण कराल तर मुंबई पोलीस कमी पडणार नाही! – संजय पांडे

Aprna

एल्गार परिषदेत महत्वाची भूमिका असलेल्या २ जणांना अटक

News Desk