HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीत एकाच कुटुंबात ५ जण कोरोना पॉझिटिव्ह, राज्याच्या आकडा ११२ वर

सांगली | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. सांगलीत इस्लामपूरात एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीला महाराष्ट्राचा आकडा ११२ वर होचला आहे तर देशात हा आकडा ५७० वर पोहोचला आहे. कालपर्यंत (२४ मार्च) राज्यात १८ नवीन करोना रुग्ण आढळले होते. यात मुंबईचे ६, सांगलीच्या इस्लामपूरमधील ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश होता. महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्या दाम्पत्यांना कोरोना झाला होता त्यांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली असून आज (२५ मार्च) त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे जरी आकडा वाढत असला तरी कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ही एक आनंदाची बातमी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२५ मार्च) रात्री ८ वाजता भारतीयंना संबोधित केले. त्यात त्यांनी आजपासून २१ दिवस भारत बंदची घोषणा केली. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद राहील, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना घरी राहमे गरजेचे आहे असेही त्यांनी नागरिकांना सांगितले. तसेच, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत असलेल्यी संचारबंदी ही १५ एप्रिलपर्यंत वाढवली असल्याचेही सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांना ‘तो’ सल्ला मीच दिला होता!; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

News Desk

हसन मुश्रीफांचे फडणवीस आणि पाटलांवरील आरोप अत्यंत बालीश,भाजपचा पलटवार !

swarit

साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डीत आजपासून बेमुदत बंद

swarit