HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरच्या रुग्णालयातून दहशतवादी फरार

श्रीनगर | श्रीहरी सिंह या सराकरी रुग्णालयातून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याच दरम्यान रुग्णालयात गोळीबारी करण्यात आली होता. नवीद उर्फ अबू हंझला या लष्कर-ए-तोयबचा दहशतवाद्याने पोलिसांच्या हातातून बंदूक खेचून घेऊ अंदाधुंद गोळीबारी सुरू केली. अचानक झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन नवीद हा दहशतवादी फरार झाला.

सहा दहशतवादी कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेलमधून रुग्णालयात नेण्यात आले होते. या गोळीबारीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहे. यानंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फरार दहशतवाद्यांचा कसून तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आसाराम बापूला ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

News Desk

केदारनाथमध्ये वायूसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk

नागालँडमधील बंडखोरांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

News Desk
मुंबई

तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? : विखे पाटील

swarit

मुंबई | राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन झाले असताना सरकार त्यातील मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचे पीठ करून पकोडे तळायचे का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

तूर खरेदीबाबत एकरी मर्यादा घालणाऱ्या परिपत्रकावरून सरकारवर टीकेची झोड उठवताना विखे पाटील म्हणाले की, एक तर मुळात शासकीय तूर खरेदीसाठी उशीर झाला आहे. त्यातच सरकारने शासकीय तूर खरेदीसाठी घातलेली जिल्हानिहाय एकरी मर्यादा शेतकरी विरोधी असून, यासंदर्भातील परिपत्रक तातडीने मागे घेतले पाहिजे.

या परिपत्रकानुसार खरेदी झाली तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनाच्या एक तृतियांश तूर देखील हमीभावाने खरेदी होणार नाही. काहीही झाले तरी आम्ही सरकारला संपूर्ण तूर खरेदी करायला भाग पाडू. सरकार हे अन्यायकारक परिपत्रक मागे घेणार नसेल तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मंगळवारी यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याची माहिती देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिली.

Related posts

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग

News Desk

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

News Desk