HW News Marathi
महाराष्ट्र

डहाणू-सांगलीतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत

मुंबई : डहाणूजवळच्या समुद्र किनाºयावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थिनी तसेच सांगली येथील सद्भवना रॅलीनंतर परतताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चारही मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत जाहीर केली आहे.

डहाणूजवळच्या समुद्र किनाºयावरील दुर्घटनेत मसोली ता. डहाणू येथील सोनल भगवन सुरती, जान्हवी हरीश सुरती आणि संस्कृती सूर्या माह्यावंशी या तीन विद्यार्थिनी मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून जाहीर करण्यात आली आहे. तसेच सांगली येथे गेल्या रविवारी जिल्हा प्रशासनातर्फे काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीत उपस्थित राहून परतणाºया ऐश्वर्या शशिकांत कांबळे या विद्यार्थिनीचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला प्राणघातक हल्ला; रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

Aprna

रमेश देव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

“कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल तर तो आमचा हात!”

News Desk