HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळाने प्रचंड होरपळलेल्या मराठवाड्याची दाहकता कमी करत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनने अखेर दमदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अत्यंत भीषण दुष्काळस्थितीला तोंड दिल्यानंतर झालेल्या वरुणराजाच्या आगमनाने इथल्या लोकांना प्रचंड सुखावले आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर परभणीसह सेलू, मानवत, पाथरी तालुक्यांतही समाधानकारक पाऊस झाला आहे.

दुष्काळात होरपळून निघालेल्या बीड जिल्ह्यात वरुणराजाने हजेरी लावताच इथल्या लोकांनी या वरुणराजाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील गणपती मंदिरासमोर जिल्ह्यात पडलेल्या पहिल्या पावसाच्या पाण्याची पूजा करण्यात आली आहे. गणपती मंदिराच्या पुजाऱ्यांनी या पहिल्या पावसाच्या पाण्याची अगदी विधिवत पूजा केली आहे. दरम्यान, हिंगोलीत पडलेल्या मुसळधार पावसात वीज पडल्याने २ जनावरे दगावली असून शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमी शेतमजुराचा तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी तटकरेंची नियुक्ती

News Desk

मुख्यमंत्री आता पुन्हा राज्य कसे काय गहाण टाकणार ? | अशोक चव्हाण

Gauri Tilekar

बेस्ट प्रशासनाचा डबल डेकर घोटाळा!

Aprna