HW News Marathi
देश / विदेश

नोटबंदीमुळे कष्टकरी उद्धवस्त: राहुल गांधी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारकडून ‘काळापैसा विरोधी दिन’ साजरा केला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. ‘रिझर्व्ह बँकेशी कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीचा निर्णय घेत मोदींनी असंघटित कामगार क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले. नोटाबंदीमुळे मध्यम आणि लघु उद्योजकांना मोठा फटका बसला,’ असेही राहुल गांधींनी म्हटले.

बेरोजगारीमुळे लोकांच्या मनात मोठा राग असताना मोदींनी धार्मिक द्वेषाचे राजकारण सुरू केले. लोकांच्या मनातील रागाचा मोदींनी वापर केला. बेरोजगारीमुळे लोकांच्या मनात संताप असताना मोदींनी द्वेषाचे राजकारण करून स्वत:चा बचाव केला. द्वेषाचे राजकारण मोदींना सत्तेत आणू शकते. मात्र त्यामुळे देशातील बेरोजगारीची समस्या सुटणार नाही,’ असे राहुल म्हटले आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. मात्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास पुसून टाकला,’ असेही गांधी यांनी लेखात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाजपेयींच्या निधनामुळे सात दिवस राजकीय दुखवटा

News Desk

राधे माँ यांचे जुन्या आखाड्यात पुनरागमन !

News Desk

PMLA कायद्यातील ईडीचे अधिकार अबाधित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna