HW News Marathi
क्राइम

अकोला भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

अकोला बुधवारी सकाळी सात वाजता ट्रकने बाईकला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. आपताबोद्दी कलिमोद्दीन 17 आणि मुज्जमिल शेख (20)असे मृतांचे नाव आहेत. दोघंही बाईकने नवीन वस्तीकडे जात होते. यादरम्यान, अमरावतीहून अकोल्याकडे जाणा-या भरधाव ट्रकनं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील चौकशी सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अभिनेता आदित्य पंचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी; मुंबईच्या गिरगाव न्यायालयाचा निर्णय

Aprna

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला गांधीनगर सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Aprna
मुंबई

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk

– मुंबईतल्या तीन रेल्वे स्थानकांत उभारणार पादचारी पुल

मुंबई – एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. म्हणून त्यांनी तीन स्थानकांवर तीन नवे पूल तातडीने उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. विशेष म्हणजे हे पुल बांधण्याचे काम आपल्या पराक्रमाने जगामध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय लष्कराला देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा अर्थ पूल बांधण्यासाठी रेल्वे प्रशासन नक्कीच सक्षम नाही. ते हतबल आहेत अशी चर्चा सुरू आहे. या बाबत रेल्वे मंत्र्यांना विचारलं असता हे पुल तातडीने पूर्ण व्हावेत त्याचे काम युद्ध पातळीवर व्हावे म्हणून लष्कराला पाचारण करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या तीन स्थानकांवर नवे पादचारी पूल उभे करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या तीनही पुलांचं काम ३१ जानेवारी २०१८ च्या आत करण्याचं उद्दीष्ठ लष्करानं ठेवलं आहे. दरम्यान एल्फिन्स्टन येथील पादचारी पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पुलासाठी आवश्यक सामुग्री तयार केल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुढच्या १५ दिवसांत – म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत हा पूल बांधून तयार होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित सर्व छोटी-मोठी कामं संपवून तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

Related posts

डीजेवरील बंदी कायम | उच्च न्यायालय

Gauri Tilekar

विमानतळ नामकरणाचा वाद, सेनेने थोपटले दंड

News Desk

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk