HW News Marathi
Uncategorized

…टीका करणाऱ्यांची मने प्रदूषित!

मुंबई | कधीही न झोपणाऱ्या मुंबई शहाराची ओळख आता सत्यात उतरणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या नाइट लाइफचा मांडलेला प्रस्ताव अखेर आज कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुर झाला असून २७ जानेवारीपासून या प्रयोगाची अंमवबजावणी होणार आहे. नाइट लाइफच्या या प्रस्तावाला अनेकांनी विरोध केला होता त्यावर आघाडी होती ती भाजपाची. त्यामुळे आता अंमल झालेल्या या प्रस्तावानंतर टीका करणाऱ्या भाजपांच्या नेत्यांवर आदित्य ठाकरेंनी जोरदार तोफ डागली आहे. ‘नाइट लाइफच्या प्रयोगाने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे अशा या शुद्ध हेतूने सुरु होणाऱ्या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनेच प्रदुषित आहेत’, अशी जोरदार टीका आदित्य यांनी केली.

मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याची संकल्पना आदित्य ठाकरेंनी खुप आधी मांडली होती पण काही कारणाने ती पुर्णत्वास नेता आली नव्हती पण महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये ही संकल्पना अखेर पुर्ण झाली. सुरुवातीला काही भागांत हा प्रयोग केला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ‘नाइट लाइफचा प्रयोगचा भाजपने महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. यावर भाजपचे नेते राज पुरोहित म्हणाले की, “मुंबईत नाईटलाइफ सुरु केल्यास हजारो निर्भयासारखी प्रकरणे घडतील, ” असा दावा त्यांनी केला होता. ही आपली संस्कृती नाही, अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. मुंबईकरांना त्रास झाल्यास या योजनेला कडाडून विरोध करण्याचा इशाराही भाजपनं दिला होता.

भाजपच्या या टीकेचा आदित्य ठाकरेंनी त्यांच्या या टीकेची सडेतोड उत्तरे दिली आहेत. ‘महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठीच काम करते आहे. लोकांच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. ‘नाइट लाइफ’चा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी करत आहोत. आमचं मन स्वच्छ आहे. शुद्ध हेतूनंच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ असा शाब्दिक वार आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षावर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Sharma केसमध्ये बीड पोलिसांची थेट मुंबईकडे झेप, Sharma यांना जामीन मिळणार ?

News Desk

“Parambir Singh जातील कुठे? देशातच असतील, राज्य सरकारची जबाबदारी”- Raosaheb Danve

News Desk

५ हजार गरीबांना अन्न धान्य वितरित करुन घडवला आदर्श…

swarit