HW News Marathi
महाराष्ट्र

साईबाबांचे जन्मस्थळ वादावर चर्चेतून मार्ग काढू !

मुंबई | साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असलेल्या वादाच्या निषेधार्थ आजपासून (१९जानेवारी) शिर्डीत बेमुदत बंदला सुरुवात झाली आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी (१८ जानेवारी) रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बंद काळात साईबाबा मंदिर भक्तांनसाठी खुले राहणार असून दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत. “मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (२० जानेवारी) दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक बोलावली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी आणि शिर्डीच्या नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुख्यंत्र्यांप्रमाणे मी देखील कोणाच्या भावना न दुखवता चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करतोय. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेतील. मुख्यमंत्री या बैठकीत पाथरी आणि शिर्डीच्या लोकांचे म्हणणे ऐकूण त्यावर योग्य निर्णय घेतील”, असे अजित पवार म्हणाले. नगर-परभणीतील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसोबत उद्या होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची खासदार सदाशिव लोखंडे यांनी माहिती दिली आहे.

नेमका वाद काय आहे

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर ठिणगी पडली. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री साईबाबा यांच्या जन्मस्थळ यावर भूमिका मांडत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष शेलारांनी घेतली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट

News Desk

राज्यात १ मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपेंचं मोठं विधान

News Desk

एकीकडे घरे लपवण्याचा आरोप तर दुसरीकडे बायका लपवण्याचा आरोप, भाजपचा टोला

News Desk