HW News Marathi
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

मुंबई अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत अंगनवाडी शिष्टमंडळाची बैठक फिस्कटल्याने अंगनवाडी कर्मचा-यांचे संप चिघळले आहे. येत्या ८ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याच्या मुद्द्यावर संप मागे घेण्याचं आवाहन मुनगंटीवार यांनी केले होते. पण निर्णय लागेपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भुमिका कृती समितीने घेतली.

सोमवारपासून बेमुदत संप पुकारलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंगळवारी आझाद मैदानावर धडकला. हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या कर्मचाऱ्यांनी आजाद मैदान हाऊसफुल्ल झालं आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांनी महापालिका मार्गाचा पदपाथ कब्जा केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील पोषण आहार व लसीकरण सेवा ठप्प पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

News Desk

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे… राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – अजित पवार

News Desk

बँकिंग कायदा दुरुस्तीविरोधात लढा उभारा, शरद पवारांचा केंद्रविरुद्ध लढा

News Desk
राजकारण

गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांकडे जातो | राहुल गांधी

News Desk

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदी सरकार देशातील गरीबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱ्या भाजपा, आरएसएसविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत. लोकांच्या भावना विरोधक राजकीय व्यासपीठावर मांडत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले तरी देशात पेट्रोलचे दर महाग आहेत.

हा पैसा थेट श्रीमंतांच्या खिशात जात आहे. देशातील श्रीमंतांसाठी सरकार काम करत आहे, त्यांची कर्जे माफ केली जात आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटीतंर्गत आणावेत अशी आमची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडून दुर्लक्ष करत होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. दरम्यान, राहुल गांधी आज चंद्रपुरात दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाणार आहेत.

Related posts

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk

राजकीय नेत्यांनी केला वायूदलाला सलाम

News Desk

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

News Desk