HW News Marathi
देश / विदेश

नोटबंदीतून किती काळा पैसा आला याची माहीती नाही, आरबीआयचा संसदीय समितीला अहवाल सादर

नवी दिल्ली: केंद्र सरकराने गेल्या वर्षी लागू केलेल्या नोटंबदीतून किती काळा पैसा उघडकीस आला किंवा नष्ट केला, याबाबत कुठलीही आकडेवारी हाती आली नसल्याची धक्कादायक माहीती रिझर्व बँकेने संसदीय समितीला सादर केली आहे. ज्या कारणासाठी ही नोदबंदी लागु केली होती. ती निष्फळ ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी केंद्र पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. वर्षभरात १५ हजार कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या. एकूण चलनात असलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा पुन्हा जमा झाल्याने नोटाबंदीचा हेतू असफल ठरल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. त्यात आरबीआयने काळा पैसा किती आला, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, आरबीआयकडे काळ्या पैशाची काहीही माहीती नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात दाखल

News Desk

छत्तीसगढमध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी नक्षलवादी हल्ला

News Desk

सुखोई आणि मिराज लढाऊ विमान मध्य प्रदेशमध्ये कोसळले; 2 वैमानिक सुरक्षित तर 1 गंभीर जखमी

Aprna
देश / विदेश

चक्रीवादाळाने इतिहास भूगोल बदलला

News Desk

फ्लोरिडा-फ्लोरिडामध्ये नुकतेच आलेल्या इरमा वादळ्याने या परिरसराची भौगोलिक ओळख पुसून टाकली आहे. परिसरातील नव्वद टक्के घरे उध्वस्त झाली आहेत. सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले नागरिक आपल्या घराकडे परतु लागले आहेत. परंतु घरं भूईसपाट झाल्याचे पाहून अनेकांना आश्रु आले. परिसरातील सर्व घरे अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत. एकही घर शिल्लक नाही. जे शिल्लक आहेत. त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे घरी परतुन राहायचे कुठे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. मालमत्तेसोबत घरातील अनेक मौल्यवान वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे. कार, वाहने यांचेही नुकसान झाले आहे. एकूणच या वादळाने सर्वस्व उध्वस्त केल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वादळ शमले असले तरी त्याच्या कटू आठवणीतून बाहेर येण्यासाठी कित्येक वर्ष द्यावी लागणार आहेत. सध्या घरांची दुरूस्ती करून निवारा निर्माण करण्यावर येथील नागरिक भर देत आहेत. दरम्यान, घरी परतलेल्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. वादळात वीजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. तो पूर्ववत होत नसल्याने नागरिकांनी गर्मीने हाल सुरू आहेत.

Related posts

काश्मीरमधील कलम ३५-अ आणि ३७० हटवण्यासाठी मोदी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

मराठमोळे मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला

News Desk

मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर ?

News Desk