HW News Marathi
मुंबई

गुजरात, महाराष्ट्रात स्वाइन फ्लुचा कहर, आठशे लोकांचा बळी

मुंबई- स्वाइन फ्लुन आजाराने कहर केला असून गुजरात व महाराष्ट्रात सुमारे आठशे जणांचा बळी गेल्याची माहीती सरकारने जारी केली आहे. एकट्या महाराष्ट्रात 490 तर गुजरातमध्ये 343 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वाइन फ्लुच्या बळींचा आकडेवारी नुकतीच जारी केली आहे. त्यानुसार देशभरात गेल्यावर्षी २२,१८६ जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली. व्हायरस स्ट्रेनमधील झालेल्या बदलामुळे स्वाइन फ्ल्यूच्या लागणचे प्रमाण वाढल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नॅशनल सेंटर फॉर डिजिस कंट्रोल (एनसीडीसी), दिल्लीतील एम्स आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी संस्थेने एक सर्व्हे केला आहे. त्यानुसार गेल्यावर्षीपेक्षा यंदा स्वाइन फ्ल्यूचे वेगळे स्ट्रेन आढळून आले आहेत. यंदा स्वाइन फ्ल्यूचे मिशीगन स्ट्रेन आढळून आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या पुतण्याला अटक

News Desk

मुलीने पळून जावून प्रेमविवाह केला, तिकडे आई-वडिलांनी रेल्वेखाली जीव दिला

News Desk

माझा मित्र येतोय,फडणवीस

News Desk
Karnataka Election 2018 देश / विदेश

जल्लोष कर्नाटक विजयाचा…

News Desk

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे अस्तित्व पणाला लागले होते. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपला जनतेने कौल दिल्याचे दिसून आले.

मुंबई अध्यक्ष आशिष शेलार कर्नाटक निवडणूक प्रचारासाठी कर्नाटक मध्ये स्वतः गेले होते अनेक ठिकाणी ते सभेत सहभागी झाले होते. मुंबईसह महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा या प्रचारात सहभाग असल्यामुळे अख्या महाराष्ट्रातील नेते कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक महत्वाची होती.

प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक असल्यामुळे यामध्ये मिळाले विजयाचा जल्लोष देखील भाजप कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने केला. ढोल ताश्याच्या गजरात लाडू पेढे वाटून भाजप कार्यकर्त्यांनी हा विजयोत्सव साजरा केल्याचे चित्र मंगळवारी भाजपच्या मुंबई स्थित मध्यवर्ती कार्यालयात पहायला मिळाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला तर दारा सिंग या ढोल ताश्याच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला.

भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यालयात भाजपचे नेते कार्यकर्ते यांनी एकत्र येत या विजयाचा जल्लोष साजरा केला. 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. यामध्ये भाजपचा विजय झाल्यामुळे येत्या काळात काँग्रेस ला जनता किती साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related posts

पिकनिकला गेलेल्या बसचा अपघात, १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

News Desk

गेल्या ७० वर्षात एकाही  ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात आले नाही !

News Desk

कुठल्याही क्षणी शशिकला यांना अटक होणार

News Desk