HW News Marathi
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विषबाधा

News Desk

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी

News Desk

लोकल ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना मृत्यू झाल्यास रेल्वेकडून नुकसान भरपाई

swarit
राजकारण

क्रिकेट विश्वाचा पहिला सम्राट हरपला | आठवले

News Desk

मुंबई | भारतीय क्रिकेटची गुणवत्ता जागतिक स्तरावर पहिल्यांदा सिद्ध करणारा क्रिकेटविर अजित वाडेकर होते. कसोटी क्रिकेटपटू, कर्णधार , प्रशिक्षक अश्या सर्व भूमिकांतून आपल्या गुणवत्तेचा क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचा उमटविलेले आणि संपूर्ण आयुष्य क्रिकेट जगलेल्या अजित वाडेकर यांच्या निधनाने क्रिकेटविश्वाचा पहिला अनभिषिक्त सम्राट हरपला आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत अजित वाडेकर यांना आदरांजली वाहिली आहे.

दिवंगत अजित वाडेकर यांनी कसोटी क्रिकेट च्या सलग तीन सिरीज त्यांच्या कर्णधारपदाच्या काळात भारताला जिंकून दिल्या. परदेशात पहिला विजय भारतीय क्रीकेट संघाला मिळवून देणारे पाहिले कर्णधार ते होते. अजित वाडेकर हे अर्जुन पुरस्काराचे तसेच भारताच्या अत्यंत सन्मानाच्या पद्मश्री किताबाचे ते मानकरी ठरले होते.

दिवंगत अजित वाडेकर यांनी प्रशिक्षक पदाच्या काळात अनेक क्रिकेटपटू घडविले.त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून ही खूप मोठी कामगिरी केली आहे. अजित वाडेकर या महान क्रिकेटविराच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

Related posts

मी आता निवडणुक लढणार नाही। चंद्रकांत पाटील

News Desk

राम मंदिरासाठी कायदा करा, सरसंघचालक भागवतांचे वक्तव्य

News Desk

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

Aprna