HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींविरोधातील दुहेरी नागरिकत्वाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेली दुहेरी नागरिकत्वाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत असा आरोप करत राहुल यांच्यावर निवडणूक लढविण्यास बंदी घालावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, या याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर काही प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील राहुल गांधी यांना याबाबत नोटीस बजावली होती. “तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करा”, असे गृहमंत्रालयाने म्हटले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आता या प्रकरणी राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. याचिकेतील आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

News Desk

तुम्हाला जनतेने राज्य दिले, आता मंत्रिमंडळ विस्तार तरी करा !

News Desk

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

News Desk