HW News Marathi
देश / विदेश

तिहेरी तलावर सहा महिन्यांची बंदी, केंद्र सरकारला कायदा करण्याचे आदेश

नवी दिल्ली -संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘ट्रिपल तलाक’ प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुस्लिम समाजातील महिलांसाठी अन्यायकारक असलेली ही प्रथा घटनाबाह्य ठरवत न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत कायदा करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत ही प्रथा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुस्लिम महिलांना देण्यात येणारा तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा आरोप करत शायरा बानो या मुस्लिम महिलेने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे या महिलेने लक्ष वेधले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

थायलंडच्या गुहेतून आतापर्यंत ११ मुले बाहेर

News Desk

दहशतवादी हल्ल्यात पालघर येथील दोनजण ठार

News Desk

हॅट्रीक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये !

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तिवारी यांचे निधन

News Desk

दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नारायण दत्त तिवारी यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२५ ला झाला होता. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे २००७ पासून राज्यपाल होते. ते मार्च २००२ ते मार्च २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी १९७६ ते एप्रिल १९७७, ऑगस्ट १९८४ ते सप्टेबर १९८५ आणि जून १९८८ ते डिसेंबर १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अशाप्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रापद भुषविण्याचा मान त्यांना मिळाला.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्याचबरोबर जून १९८० ते जुलै १९८१ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.त्यानंतर ऑक्टोबर १९८० ते फेब्रुवारी १९८३ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, उद्योगमंत्री, अवजड उद्योगमंत्री आणि कायदामंत्री ही पदे भूषविली. तसेच जून १९८५ ते ऑक्टोबर १९८६ या काळात ते पेट्रोलियम मंत्री,ऑक्टोबर १९८६ ते जुलै १९८७ या काळात ते परराष्ट्रमंत्री आणि जुलै १९८७ ते जून १९८८ या काळात ते अर्थमंत्री होते.

Related posts

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna

Union Budget 2021 | नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केंद्राकडून अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद

News Desk

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला

Darrell Miranda