HW News Marathi
Uncategorized

स्तनांचा कर्करोग दरवर्षी ७६ हजार बळी घेणार

दुबई – स्तनांचा कर्करोग २०२० पर्यंत भारतात दरवर्षी ७६ हजार महिलांचे बळी घेईल, अशी भीती एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. २०१२ मध्ये भारतात ब्रेस्ट कॅन्सरमुळे दगावलेल्या महिलांची संख्या ७०,१२८ होती, असं या जर्नल ऑफ बिझनेस रिसर्च मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे.

भारत सरकारसाठी या आजाराचं मोठं आव्हान असल्याचं दुबईच्या वोलोगाँग विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक विजय पेरेइरा यांचं म्हणणं आहे. या रोगाबाबतच्या जनजागृतीचा अभाव, स्व:तपासणीचा अभाव, सांस्कृतिक तफावत या सगळ्याचा एकत्रित परिणाम होतो आणि या रोगाचं निदान विलंबाने होतं. महिलांना आरोग्यसेवा मिळत नाहीत. अनेकदा पुरुष डॉक्टर असल्याने महिला या आजाराविषयी मोकळेपणी बोलत नाहीत. त्या कुटुंबावर अवलंबून असल्याने स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, असे हा अभ्यास सांगतो. ब्रेस्ट कॅन्सरबाबत पुरुषांची जनजागृती केल्यास कुटुंबातील महिलांच्या या रोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल, असंही या अहवालात सुचवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शहीदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर एका व्यक्तीला सरकारी नोकरी

News Desk

शेतक-यांसाठी खुश खबर, रसायनिक खतांवर 5 टक्के कर

News Desk

संजय राऊत सपत्नीक शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर!

News Desk
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, ७ जणांचा मृत्यू तर २२ जखमी

News Desk

श्रीनगर | पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. २२ मे रोजी पाकिस्तानने कथुआ जिल्हामधील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीएसएफच्या जवळपास ४० चौक्यांवर पाकिस्तानानने निशाणा साधला आहे. या हल्याला भारतीय लष्कराने मात्र चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत सात नागरीकांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत.

Related posts

सत्तेत असताना माझाही फोन टॅप झाला ही दुर्दैवाची गोष्ट !

swarit

लष्करातील महिलांना स्थायी कमिशन लागू 

swarit

मोदींमुळे देशात आर्थिक संकटाचे सावट

News Desk