HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधीवरील हल्ल्याला ते स्वत:च जबाबदार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौऱ्यावर असताना सुरक्षेचे नियम पाळले नाहीत. तसेच सरकारी संरक्षण घेण्यासही ते नेहमीच टाळाटाळ करतात. सरकारी संरक्षण नाकारून ते काय सिद्ध करू पाहात आहेत, असा कठोर सवाल करून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी, मंगळवारी संसदेत विरोधकांचा हल्ला परतवून लावला. तसेच राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याला ते स्वत:च जबाबदार असल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले.

मागील आठवड्यात गुजरात दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक झाली होती. काँग्रेसखासदारांनी मंगळवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस सदस्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देताना राजनाथ यांनी राहुल यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ‘गुजरात दौऱ्यावर असताना राहुल यांनी स्थानिक पोलिसांच्या सूचनांकडेदुर्लक्ष केले. ते फक्त स्वत:च्या सचिवाचेच ऐकत होते. पोलिसांनी पुरवलेले वाहन त्यांनी घेतले नाही. बुलेटप्रूफ कारमध्ये बसण्यासही त्यांनी नकार दिला. इतकेच नव्हे, पोलिसांचे सुरक्षा कडेही त्यांनी अनेकवेळा तोडले,’ असे राजनाथ सांगितले.

‘गेल्या दोन वर्षांत राहुल गांधी यांनी सहा वेळा परदेश दौरा केला. ते तब्बल ७२ दिवस परदेशात होते. या काळात सरकारने त्यांना देऊ केलेले संरक्षण त्यांनी घेतले नाही. ते संरक्षण का घेत नाहीत? ते नेमकं काय लपवू पाहत आहेत,’ असा रोखठोक सवालही राजनाथ यांनी या वेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकास दुबे पोलीस चकमकीत ठार !

News Desk

हरियाणात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक | आठवले

News Desk

२०१९मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू, डब्ल्यूपीसीआयचा रिपोर्ट

News Desk