HW News Marathi
देश / विदेश

सिमेवर पुन्हा गोळीबार, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीर- नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच असून गेल्या २४ तासात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या नौगाम, केरन आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. 0राजौरी भागातील सुंदरबनीमध्ये शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात आपला एक जवान शहीद झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. जयद्रथ सिंह असं या शहीद जवानाचे नाव आहे. बुधवारी भिंबेर गली सेक्टरमधील नौशेरा सेक्टरमध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या चौक्यांवर पाकिस्तानने अकारण गोळीबार केला होता. याचबरोबर पाकिस्तानच्या जवानांनी राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील बालाकोट, धार, लांबिबरी, राजधानी, मानकोट, संदोट येथे बुधवारी सकाळी उखळी तोफांचा मारा सुरू केला होता. त्यात नियंत्रण रेषेवरील संदोट या छोट्या खेड्यातील रझा नावाचा रहिवासी जखमी झाला. तर, पाकिस्तानने मंगळवारी पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अनेक खेडी व लष्कराच्या ठाण्यांवर उखळी बॉम्बचा मारा केला होता. त्यात दोन जवान शहीद तर सहा जण जखमी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फ्लोरिडात हॉट योगा स्टुडियोमध्ये गोळीबार

swarit

#AeroIndia2019 : ‘एरोइंडिया’च्या शो दरम्यान कार पार्किंगला भीषण आग

News Desk

देशातील २२ राज्यातील बळीराजा १ जूनपासून संपावर जाणार

News Desk
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे आयएसआय !

News Desk

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

swarit

बलात्कारचा प्रयत्न फसल्याने इमारतीवरून ढकलले

News Desk