HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारने नीट बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती! – प्रीतम मुंडे

बीड | राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि मशीदीवरील भोंग्याचा मुद्दा गाजत असताना ओबीसी आरक्षणावरूनही पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्वरत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका या घ्याव्या लागणार आहेत. यावरून बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सारकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली असती, तर कदाचित हा धक्का बसला नसता असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. माहितीची पूर्तता न केल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला आहे. असा गंभीर आरोप प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुका याही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. आता पुन्हा हीच वेळ आल्याने ओबीसी समाजात नाराजी आहे.

गुन्हेगारीचा पाढा वाचून दाखवला

तर बीडमधली कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही त्यांनी हल्लाबोल केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खून, दरोडे, बलात्कार आणि हाणामाऱ्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यस्था बिघडल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक देशमुख यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीबद्दल पाढा वाचून दाखविला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोधी तर दोन जागांसाठी होणार लढत

News Desk

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

राज्यात लॉकडाऊनच्या काळात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६ आरोपींना अटक, महाराष्ट्र सायबरची प्रभावी कामगिरी

News Desk