HW News Marathi
क्राइम

जळगाव जिल्हाधिका-याला आयएसआयएसकडून धमकीचे पत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रपती भवन उडवून देण्याची धमकी

जळगाव दहशतवादी संघटना आयएसआयएसने टपाल खात्याने जळगाव जिल्हाधिका-याला धमकीचे पत्र पाठवले आहे. यापत्रात राज्यात मानवी बॉम्ब स्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पत्रात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या राजकीय नेत्यांसह रेल्वे स्टेशन आणि धार्मिक स्थळे उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यायाने या पत्राची माहिती तातडीने राज्याच्या गृहविभागाला कळवली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

News Desk

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे यांच्यासह तीन जणांना जामीन मंजूर

Aprna

एक कोटींची ब्राऊन शुगर जप्त

News Desk
देश / विदेश

अहमदाबादेत मुस्लिमांनी केली मंदिराची स्वच्छता

News Desk

अहमदाबाद गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर तिथे अनोखा बंधुभाव पाहायला मिळत आहे. बनासकांठातील धानेरामध्ये मुस्लिम बांधवांनी येथील मंदिरांमध्ये साचलेला चिखल स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे फोटो वेगाने सोशल मीडियात व्हायरल होतआहेत.

धानेरामध्ये सिद्धिविनायक गणपती आणि सतीमाता मंदिर असून या मंदिरांमध्ये जवळपास ८ ते १० फूट पुराचे पाणी भरले होते. हे पाणी ओसरल्यानंतरमंदिरात चिखलाचा थरच लागला होता. १५ ते २० मुस्लिम बांधवांनी हा सगळा चिखल बाहेर काढून मंदिर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. जमिया उलेमा ए हिंदचे हेकार्यकर्ते पालमपूर येथून आले होते. पुराचा तडाखा बसलेल्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले होते. मी एकटाच सफाई करत असल्याचे पाहून त्यांनीमदतीचा हात पुढे केला. सुमारे दोन तास श्रमदान करून त्यांनी पूर्ण मंदिर स्वच्छ केलं. गणपती मंदिरानंतर त्यांनी जवळच असलेल्या सतीमाता मंदिरातही साफसफाईकेली असे, येथील पुजऱ्याने सांगितले.

Related posts

कर्नाटकात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या दिल्लीत,बैठकीत विविध अजेंड्यावर होणार चर्चा

News Desk

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीला ट्विटरवरून धमकी

News Desk