HW News Marathi
मुंबई

मुंबईत बारावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

केवळ चार गुणांनी नापास झाल्यानं आत्महत्या केल्याचा संशय

मुंबई – काल बारावीचा निकाल लागला. त्यात फक्त चार गुण कमी मिळाल्यानं नापास झालेल्या सिद्धार्थ कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या दीप्ती दीपक मोरे हीनं आत्महत्या केलीय. प्रतिक्षा नगर मधल्या पंचशील नगर इथल्या राहत्या घरी दीप्तीनं आत्महत्या केलीय.

काल निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दीप्तीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आई-बाबा मला माफ करा, असा मजकूर लिहिलाय. मूळची कोकणातल्या मालवण जवळील मसुरा हे मोरे कुटुंबियांचं मूळ गाव असून दीप्तीला इयत्ता चौथीत शिकणारा भाऊ आर्यन आणि सातवीत शिकणारी द्रीप्ती ही बहीण आहे. तिचे वडील हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. दीप्तीला दहावीत 85 टक्के गुण मिळाले होते. मुळात हुशार असलेल्या दीप्तीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वडाळा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२ तास उलटून गेले तरी चर्चा सुरूच, बेस्टचा संप आज तरी मिटणार का ?

News Desk

1300 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

swarit

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat