HW News Marathi
महाराष्ट्र

अंबाबाई… कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे – अजित पवार

कोल्हापूर – राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे, असं साकडं कोल्हापूरच्या अंबाबाईला घातल्याचं राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून कोल्हापूरमधून सुरूवात झाली आहे. कोल्हापूरातील संघर्षयात्रेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे ! असे साकडे कोल्हापूरच्या आंबाबाईला घातले आहे, असेही अजित पवार यांनी कोल्हापूरातील संघर्ष यात्रेमध्ये म्हटले. तुरडाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात अजित पवार म्हणाले की, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तुरडाळ खरेदी करण्यामध्ये कमी पडल्याचे मान्य केले आहे. पण, शासनाला केवळ चूक मान्य करुन चालणार नाही तर तुरडाळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात कर्जमाफी केली, मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या अभ्यासासाठी अडीच वर्षे का लागतात? असा सवाल उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

सत्तेच्या जोरावर राज्य शासनाला शेतकऱ्यांची आंदोलने चिरडून टाकता येणार नाहीत, तुरडाळ संपेपर्यंच ती खरेदी केंद्राच्या माध्यमातून विकत घेण्याचा शब्द देऊनही राज्य शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शासनाने तुरडाळ केंद्रे त्वरित सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा राज्य शासनाविरुद्धचा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर पत्रकार परिषदेत दिला. विखे म्हणाले की,उत्तर प्रदेशप्रमाणे एक लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी मान्य नाही. त्यांचा सात बारा पूर्ण कोरा होईपर्यंत संघर्ष लढा सुरुच राहिल. १ मे राजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतीमालाला ५० टक्के नफा मिळावा या मागणीचा ठराव संमत करुन शासनाकडे पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला – पृथ्वीराज चव्हाण 

News Desk

आईला बाजारात पाठवून घेतला गळफास

News Desk

MIMने आपण भाजपा विरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावं! – अतुल लोंढे

Manasi Devkar