HW News Marathi
महाराष्ट्र

बंद पडलेले नाफेड तुर खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करु

उत्तम बाबळे

नांदेड : – नांदेड व धर्माबाद येथील नाफेडचे तूर खरेदी गेल्या १० दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आर्थीक झळ ही सोसावी लागत आहे.त्यामुळे ही तूूर खरेदीकेंद्र त्वरीत सूरु करुन शेतक-यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नाफेडचे आणि केंद्र व राज्य शासनाच्या विरूद्ध यंत्रणेच्या सहायाने जी तूर खरेदीकेंद्र चालतात ती खरेदी केंद्र वेळोवेळी ऐनकेन कारणांनी वेळोवेळी बंद पडत आहेत. धर्माबादचे तूर खरेदीकेंद्र मागील १० दिवसापासून वेअरहाऊस उपलब्ध नाही म्हणून बंद आहे तर नांदेडचे खरेदीकेंद्र बारदाना नाही म्ळणून बंद पडले आहे. शेतकर्च्याउत्पादनाला मिळणारी आधारभूत किंमत म्हणजे नफा पुरवणे नाही तर नुकसान कमी करणे किंवा नुकसाणीतून मुक्त करने होय. हमी व योग्य भाव मिळावा म्हणुनच ही खरेदी केंद्र सूरु केली आहेत. परंतू ती केंद्र बंद पडली आहेत.त्यामुळे शेतक-यांचे हाल होत आहेत. तात्काळ ती तुर खरेदी केंद्र सुरू करावेत. काही कारनाने ही बंद पडली आहेत.तूर खरेदी केंद्रांवर माल खरेदीसाठी मर्यादीत कालावधी देण्यात आला आहे.त्याच मुद्दत काळातील १० दिवस बंदमुळे वाया गेली आहेत.ही सर्वस्वी जबाबदारी तूर खरेदीकेंद्र चालक,नाफेड,केंद्र व राज्य शासनाची आहे.म्हणुन वाया गेलेला कार्यकाळ मुद्दतवाढ करुन भरुन काढावा व ती केंद्र बंद पडलेल्या काळातील दिवसांनूसार मुदत वाढवून मिळावी. असे न केल्यास किंवा मागण्या मान्य न झाल्यास आम आदमी पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एका निवेदनातून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे फारूख अहमद, बालाजी आबादार, ज्ञानेश्वर कदम, सरोज पेठे, गुलाब जोगदंड, आनंद कदम, मो.कासिम, शिल्पा पोटलाार, मुंजाजी व्यवहारे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये पोलिस अधिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या

News Desk

‘मन बात’ नको ‘काम की बात’ करा, जळगाव दौऱ्यात शिवसेनेनं फडणवीसांची गाडी अडवत केली टोलेबाजी

News Desk

“हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे”- रविकांत तुपकर

News Desk