HW News Marathi
देश / विदेश

…तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल !

श्रीनगर | २०२० सालापर्यंत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि अनुच्छेद ३५ ए रद्द करण्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर “जर भाजपने कलम ३७० रद्द केले तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल”, असे वादग्रस्त वक्तव्य करत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्यावर वाद ओढवून घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले आहे.

“ज्या कलमातील अटींच्या माध्यमातून जम्मू काश्मीर भारताचा भाग बनला आहे तुम्ही तेच कलम जर काढून टाकण्याच्या विचारात असाल तर आम्हाला जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल”, असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. यावेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सांगितलेल्या गोष्टीच नमूद केल्याचे म्हणत मेहबुबा मुफ्ती यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आफ्स्पाबाबतच्या आश्वासनावर देखील भाष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शरद पवारांकडून अमित शहांना खास आमंत्रण’, पुण्यात होणार दुसरी भेट

News Desk

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक

News Desk

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk