HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : …आता दुसरी परीक्षा तुमची आहे दानवे !

मुंबई | भाजप-शिवसेनेच्या औरंगाबाद येथे आज (१७ मार्च) झालेल्या शिवसेना-भाजपच्या बैठकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अखेर जालन्यातून माघार घेतली आहे. “पहिली परीक्षा माझी झाली आता दुसरी परीक्षा तुमची आहे दानवे”, असे सूचक विधान शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. तर दुसरीकडे “जसे शिवसेना भाजप फेविकाॅलचा मजबूत जोड झाला आहे. तसेच अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे होतील”, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

गेले अनेक दिवस जालना लोकसभा मतदार संघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु झाला होता. अनेक बैठकांनंतरही जालन्याच्या या मतदारसंघांचा तिढा सुटता सुटत नव्हता. मात्र, अखेर आज औरंगाबादच्या बैठकीनंतर याबाबतचा स्पष्ट झाला असून जालना मतदारसंघातून अखेर अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे.

जालना मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी शनिवारी (१६ मार्च) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या समन्वयक म्हणून उपस्थित होत्या. “रविवारी औरंगाबाद येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होईल”, असे खोतकर यांनी स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींना त्यांच्या हक्कांचे आरक्षण देईल,” देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Aprna

सोमनाथ चटर्जींच्या निधनाने संसदीय राजकारणातील तपस्वी नेता हरपला

News Desk

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

News Desk