HW News Marathi
महाराष्ट्र

सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द होणार ?

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२८ फेब्रुवारी) विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पोलविण्यात आली आहे. सर्व नेत्याशी चर्चा करून अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पाहता मुंबईत सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल (२७ फेब्रुवारी) मुंबईच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. मुंबई आणि राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधभावनात ही बैठक बोलावली होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल आणि डीजी दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.

अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार विधानभवनात परिसरात असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. सर्व व्हीआयपी एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होत असल्याचेही म्हटले जात आहे. मुंबईसह राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

मुंबईत अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चांसाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त आहे. तणावाच्या वेळी हा पोलीस बंदोबस्त इतर ठिकाणी वापरात यावा, म्हणून अधिवेशन रद्द करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करणारं शरद पवारांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल  

News Desk

अवकाळी पावसामुळे राज्यातील ३२५ तालुक्यांमध्ये तब्बल ५४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

News Desk

“केम छो वरली”, शिवसेनेचे परप्रांतीय मतांसाठी राजकारण

News Desk