HW News Marathi
राजकारण

…तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही !

मुंबई | “मला मुख्यमंत्र्यांनी प्रीती भोजनाला बोलावले नाही. जोपर्यंत माझ्या जागांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रीती भोजनाला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी जाणार नाही. आमची अजून भाजपसोबत प्रीती झाली नाही”, असे म्हणत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपवरची नाराजी व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदत घेऊन भाजप-शिवसेना युतीसह अन्य अनेक बाबींवर भाष्य केले आहे.

रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • जो प्रर्यंत आमच्या जागांची मागणी पूर्ण झाली नाही तर मी प्रीती भोजनाला जाणार नाही
  • नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातच पुन्हा सरकार येईल आणि आम्ही त्यांच्यासोबतच राहू
  • आम्हाला युतीत जागा न मिळाल्याने आमच्या समाजात नाराजी
  • मुख्यमंत्री किंवा रावसाहेब दानवे पाटील यांनी माझ्याशी बोलायाला दिले होते
  • साताऱ्याची पडणारी जागा आम्हाला दिली
  • रिपब्लिक पक्षाला चार जागा मिळाल्या पाहिजेत
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनामुळे आम्ही एकत्र आलो
  • सत्तेत आल्यास आम्हाला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे व राज्यात कॅबिनेट व राज्यमंत्री देण्यात

    यावीत

  • आत्ता सुद्धा आम्हाला राज्यमंत्रीपद द्यावे
  • उद्धव ठाकरे यांनी सुरवातीला उपमुख्यमंत्री पद देतो असा प्रस्ताव देतो बोलले होते
  • भाजप कार्यालयात ही चर्चा झाली होती की केंद्रात कॅबिनेटमध्ये मंत्री देतो असे पत्र दिले होते
  • हे पत्र दिले मात्र आम्हाला काहीच मिळाले नाही
  • नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात काम करायचे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे
  • काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून बोलवण्यात येत आहे. मात्र आम्ही मोदींसोबत आहोत.
  • प्रीती भोजनाचे आम्हाला आमंत्रण नाही
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आजपासून संवाद दौरा सुरू

News Desk

“…तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

अभिनेता अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली ‘अराजकीय’ मुलाखत

News Desk