HW News Marathi
देश / विदेश

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान धास्तावला !

श्रीनगर । पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून हल्ला केला जाईल या भीतीने पाकिस्तानने सरकारने नियंत्रण रेषेजवळील नीलम, झेलम, रावळकोट, हवेली, भीमबेर या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री शक्यतो दिवे लावणे टाळा, यासह सुरक्षेच्या दृष्टीने आणखी काही सूचना या नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. जगभरातूनही या घटनेबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. यामुळे पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे. म्हणूनच पाकिस्तानी आणि विशेषतः सीमेवरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी या सूचना देण्यात येत आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या बलुचिस्तान छावणीतील कागदपत्रे तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाला सरकारने पाठविलेले पत्रातून ही माहिती समोर आली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयारी करत असल्याचे या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. पाकिस्तान सरकारने हल्ला झाला तर वैद्यकीय सुविधांकरिता तेथील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमधील २५% बेड्स जवानांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

News Desk

संभाजीराजे आणि शरद पवारांमध्ये १५ मिनिटे चर्चा ! भेटीत नेमके काय घडले ?

News Desk

अन्यथा बंद होईल ATM कार्ड

News Desk