HW News Marathi
राजकारण

भाजप-सेना युतीच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक टीका

मुंबई | “शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर ४२० चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही. तो न्यायालयात सुद्धा टिकेल असे मला मूळचा शिवसैनिक असलेल्या एका वकिलाने सांगितले”, असे ट्विट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१८ फेब्रुवारी) संध्याकाळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप-सेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा केली. यानंतर अन्य पक्षांकडून शिवसेना-भाजपवर जोरदार टीका होत आहे.

“भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची आज अभद्र युती झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, अफजल खान उर्फ अमित शाह व अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार उंदीर उर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचाराची युती आहे”, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी युतीच्या घोषणेनंतर केली.

भाजपने शिवसेनेला ईडीची (अंमलबजावणी संचलनालय) भीती दाखविल्याने शिवसेनेने युती केल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर “शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष आहे. त्यांच्या नेत्यांनी युती करून त्यांचीच फजिती करून घेतली आहे. भाजपने सांगितले असेल की आता आम्ही तुम्हाला सडवणार नाही. त्याचमुळे जनतेच्या भल्यासाठी नाही तर मातोश्रीच्या भल्यासाठीच ही युती झाली आहे. आता आगामी निवडणुकीत शिवसेना फक्त १० जागा जिंकेल”, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबाजोगाईतील डीवायएसपींची बदली, तर ग्रामीणचे पीआय सस्पेंड; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

“आदित्य ठाकरेंचे शिवसेनेसाठी योगदान काय?,” रामदास कदमांचा सवाल

Aprna

दिवाळीची खरेदी करताय, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या !

News Desk