HW News Marathi
राजकारण

काँग्रेसने केवळ मतांसाठी अनुसूचित जातींचा वापर करून घेतला !

मुंबई | काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर करून घेतला. काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती. आपल्या बापाचे स्मारक उभारले मात्र त्यांनी संविधानाच्या बापाचे स्मारक उभारण्यास पुढाकार घेतला नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक २०२० साली पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नागपूरमध्ये भाजपच्या विजय संकल्प ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य अनेक भाजप नेते उपस्थित होते.

“भाजपने अनुसूचित जातींसाठी काम केले आहे. भाजपने आणलेल्या सौभाग्य योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज, एलईडी बल्बसह गॅस आणि शेगडी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेतून लाभ झालेल्या एकूण घरांपैकी तब्बल ६० टक्के घरे ही अनुसूचित जातींमधील लोकांची होती”,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

Aprna

आंध्रची विधानसभा स्टॅच्यू ऑफ युनिटीला टक्कर देणार का?

News Desk

विधानसभेला युती निश्चित, लवकरच होणार अधिकृत घोषणा

Gauri Tilekar
राजकारण

आमची महाआघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत | पंतप्रधान मोदी

News Desk

नवी दिल्ली | “विरोधकांजवळ धनशक्ती असली तरी आमच्याजवळ जनशक्ती आहे. विरोधकांची महाआघाडी हे नामदारांचे बंधन आहे. हे बंधन भाऊ-पुतण्या वाद, भ्रष्टाचार, घोटाळा, नकारात्मकता आणि असमानता यांचे गठबंधन आहे. हा एक अद्भुत संगम आहे”, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे. ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी हे दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाजपच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. पंतप्रधान मोदीं महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

  • विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकी पूर्वीच आपल्या पराभवाचा बहाणा शोधला आहे. ते आतापासूनच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत
  • विरोधकांनी महाआघाडी केली तशी आम्ही सुद्धा केली. त्यांची महाआघाडी सर्व विरोधी पक्ष एकत्र घेऊन करण्यात आली आहे.
  • आमची महाआघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत
  • विरोधकांची महाआघाडी हे नामदारांचे बंधन आहे.
  • विरोधकांजवळ धनशक्ती असली तरी आमच्याजवळ जनशक्ती आहे
  • आता तुम्हीच सांगा कोणती आघाडी चांगली आहे ?
  • विरोधकांच्या कालच्या महामेळ्यात अनेक जण लोकशाही वाचविण्याबाबत बोलत होते. त्यातीलच एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करुन दिली. शेवटी सत्य समोर आलेच.

Related posts

“…जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे”, बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा महाराष्ट्राशी सामंजस्य करार झाला नव्हता”, उदय सामंतांचा धक्कादायक खुलासा

Aprna

महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण ?, अखेर आज होणार निश्चित

News Desk