HW News Marathi
राजकारण

आमची महाआघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत | पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | “विरोधकांजवळ धनशक्ती असली तरी आमच्याजवळ जनशक्ती आहे. विरोधकांची महाआघाडी हे नामदारांचे बंधन आहे. हे बंधन भाऊ-पुतण्या वाद, भ्रष्टाचार, घोटाळा, नकारात्मकता आणि असमानता यांचे गठबंधन आहे. हा एक अद्भुत संगम आहे”, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे. ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी हे दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाजपच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. पंतप्रधान मोदीं महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

  • विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकी पूर्वीच आपल्या पराभवाचा बहाणा शोधला आहे. ते आतापासूनच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत
  • विरोधकांनी महाआघाडी केली तशी आम्ही सुद्धा केली. त्यांची महाआघाडी सर्व विरोधी पक्ष एकत्र घेऊन करण्यात आली आहे.
  • आमची महाआघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत
  • विरोधकांची महाआघाडी हे नामदारांचे बंधन आहे.
  • विरोधकांजवळ धनशक्ती असली तरी आमच्याजवळ जनशक्ती आहे
  • आता तुम्हीच सांगा कोणती आघाडी चांगली आहे ?
  • विरोधकांच्या कालच्या महामेळ्यात अनेक जण लोकशाही वाचविण्याबाबत बोलत होते. त्यातीलच एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करुन दिली. शेवटी सत्य समोर आलेच.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो, जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती आताही करू !

News Desk

गडकरी, आंबेडकर, चव्हाणांसह दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

News Desk