HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

नागपूर | “काँग्रेस व विरोधकांकडून अशी अफवा पसरविण्यात येत आहे कि भाजप संविधान बदलणार आहे. परंतु, संविधानाचा मूळ आराखडा कुणीही बदलू शकत नाही. विरोधकांची दुकानदारी बंद झाली म्हणून ते खोटं बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करीत आहेत”, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना सुनावले आहे.

”काँग्रेसकडून केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला गेला. बाबासाहेबांचे नाव घेण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. भाजप संविधान बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा कुणीही बदलू शकत नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करणे ही आमची सर्वात मोठी प्राथमिक जबाबदारी आहे”, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरतेय”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aprna

वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

२०११ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा !

Gauri Tilekar
राजकारण

आघाडीला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नका !

News Desk

बुलढाणा | “कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होऊ नये, यासाठी हा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आघाडीला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नका. मोडता लगेच येते परंतु जोडताना दमछाक होते, त्यामुळे याचा विचार करा” असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवत आहे, तुमच्या नोकर्‍या घालवत आहे, आधारभूत किंमत देत नाही, कापसाला दर देत नाही. ज्या सरकारला कामे करण्याची अक्कल नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार ?, असे विचारत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. मग आरक्षण मागणार्‍या समाजांना अद्याप न्याय का देत नाही ?, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

“समृध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या, नाही दिले तर ही जनता तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही”, असे अजित पवार म्हणाले. “जर या सरकारने समृध्दी महामार्गाला जिजाऊंचे नाव दिले नाही तर आमची सत्ता आल्यावर आम्ही जिजाऊंचे नाव देऊ”, असे आश्वासन अजित पवार यांनी म्हटले.

Related posts

कामोठेमध्ये पैसे वाटप करणाऱ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

News Desk

“आम्हाला तोंड उघडायला लावू नका नाही तर…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

Aprna

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

News Desk