HW News Marathi
देश / विदेश

नोटाबंदीचा निर्णय हा जनतेसाठी धक्का नव्हता, आम्ही जनतेला सावध केले होते !

नवी दिल्ली | गेल्या साडे चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून वारंवार विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, उर्जित पटेल यांचा राजीनामा, विजय माल्ल्या, जीएसटी, आगामी लोकसभा निवडणुका, तिहेरी तलाक, राम मंदिर, मॉब लिंचिंग यासारख्या अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेकडून घेण्यात आलेल्या पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीत त्यांनी या सर्व मुद्द्यांवरील प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

– नोटाबंदीचा निर्णय हा जनतेसाठी धक्का नव्हता, कारण वर्षभर आम्ही जनतेला सावध करत होतो. मात्र लोकांना वाटले कि या फक्त घोषणा आहेत, म्हणून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

– बेहिशेबी मालमत्ता जमा केल्यास ठराविक दंड भरावा लागेल असा इशारा आम्ही जनतेला आधीच दिला होता.

– नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थाही मजबूत झाली, कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली, परिणामी करातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली, श्रीमंतांचा काळा पैसे बाहेर आला

– जे आर्थिक घोटाळे करुन परदेशात फरार झाले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यांना लवकरच पुन्हा भारतात परत आणले जाईल

-आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता

– राजीनामा देण्याच्या ६ ते ७ महिन्यांपूर्वीच उर्जित पटेल राजीनामा देण्याबाबत आग्रही होते

– पाकिस्तानसह जगभरातील अनेक मुस्लिम देशात तिहेरी तलाकला बंदी असल्याने हा विषय धार्मिक आस्थेचा विषय असल्याचे आपण म्हणू शकत नाही. तिहेरी तलाक हा सामाजिक असमानतेचा मुद्दा आहे

– आगामी निवडणुका तोंडावर असताना देश असहिष्णु होत असल्याची टीका चुकीची आहे. भारत हा एक सुरक्षित देश आहे. अन्य देशांकडून भारताचे कौतुक केले जाते.

– देशातील मॉब लिंचिंगसारखे प्रकार देशाच्या प्रतिष्ठेला हानिकारक ठरतात

-भाजपची सर्वसमावेशक पक्ष नाही, अशी भाजपची एक प्रतिमा बनली आहे. मात्र, ही प्रतिमा पक्षाला पुसून टाकायची आहे.

– ७० वर्ष सत्तेचा उपभोग घेतलेल्यांनी राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित ठेवला

– सरकार राम मंदिरासाठी अध्यादेश आणणार नाही. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राम मणिदर अध्यादेशाबाबत सरकार विचार करेल

– सर्जिकल स्ट्राईक ही मोठी जोखीम होती. मोहिमेच्या यशापेक्षा जवानांची जास्त चिंता वाटत होती

– पाकिस्तान हा एका युद्धाने शहाणा होणारा देश नाही त्याला शहाणे करण्यात खूप वेळ जाईल

– आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीविरुद्ध जनता असे चित्र दिसेल. कारण पंतप्रधान मोदींच्या पाठीशी जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत

-जीएसटीची प्रणाली अधिक सोपी व्हावी यासाठी आम्ही सातत्याने बदल करत आहोत. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी घातल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळाला

-पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात महागाई दर १८ टक्क्यांपर्यंत गेला होता जो आता २ ते ३ टक्के इतका आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?”,जयंत पाटलांचा संतप्त सवाल

News Desk

Tarun Sagar Died | राष्ट्रसंत तरुण सागर यांच्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk