HW News Marathi
राजकारण

आम्हाला आघाडीत घेण्याचा प्रयत्न हा केवळ त्यांचा दिखावा !

नवी दिल्ली | “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेसाठीचे जागावाटप आधीच पूर्ण झालेले असून त्यांचा आम्हाला आघाडीत घेण्याचा प्रयत्न हा केवळ दिखावा आहे”, असे भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांसह एकत्र येऊन गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसकडून महाआघाडी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न हा निव्वळ फार्स असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकर यांचा भारिपा बहुजन महासंघ असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमसोबत एकत्र आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीच्या सामील करून घ्यायचे असले तरी त्यांना भारिपा बहुजन महासंघाची एमआयएमशी असलेली आघाडी मान्य नाही. त्यामुळे भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत सामील व्हायचे असेल तर त्यांना एमआयएमशी असलेली त्यांची आघाडी तोडावी लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज

News Desk

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत सोडले मौन

Aprna