HW News Marathi
राजकारण

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

मुंबई |अयोध्या दौ-या नंतर शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे आता पंढरपुरात जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तिरावर देखील आरती करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन सरकारने दुष्काळाबाबत विविध उपाययोजना करावी तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला यावी यासाठी उद्धव ठाकरे विठ्ठलाकडे साकडे घालणार आहेत.

दुष्काळ प्रश्नाविषयी सरकारला जागे करण्यासाठी २४ डिसेंबर रोजी सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच येथूनच निवडणुकांचे रणशिंग फुकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या ‘विठाई’ या नव्या एसटी सेवेचा देखील शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीची आता डिपॉजिट वाचविण्‍याचीच लढाई | आशिष शेलार

News Desk

मुख्यमंत्री आणि आंबेडकरांनी भेटीमागचे सांगितले खरे कारण

Aprna

भाजपचे संकल्पपत्र हे राष्ट्रीय भावनेचे संकल्पपत्र आहे !

News Desk
मनोरंजन

Vijay Diwas : आज त्यांच्यामुळे देश सुरक्षित – पंतप्रधान

News Desk

मुंबई | आज विजय दिवस आहे. विजय दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विजय युद्धात शहिद झालेल्या शूर शहीदांचे स्मरण करुन अभिवादन केले. १९७१ मध्ये या दिवशी भारत-पाक युद्धात ९० ते ९५ हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते.

रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की आज देशातील लोक सुरक्षित असण्यामागे देशात शहिद झालेल्या लोकांचे पराक्रम आहेत. पंतप्रधान मोदींनी आज केलेल्या ट्विटमध्ये विजय दिवसामध्ये १९७१ च्या युद्धात अतुलनीय धैर्याने लढणा-या आपल्या बहादुर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अटल पराक्रम आणि देशप्रेम यांमुळे देश सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून जवानांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विजय दिवसाच्या औचित्य साधून रामनाथ कोविंद यांनी सैनिकांचे अभिनंदन केले आहे. रविवारी इंडिया गेट येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक लष्करी अधिकारी उपस्थित होते.

Related posts

माधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट

News Desk

आयपीएल सट्टा प्रकरणी ठाणे पोलिसांकडून अरबाजची चौकशी

News Desk

पंडित नेहरू यांच्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk