HW News Marathi
राजकारण

आता हैदराबादचेही नाव बदलणार ?

हैदराबाद | सध्या देशातील विविध राज्यांची नावे बदलण्याचा सपाटाच सर्वच राजकीय नेत्यांनी लावला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी अलाहबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ केले. आता पुन्हा हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ असे ठेवणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास आम्ही हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. रविवारी (२ डिसेंबर) हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते.

“देशात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी घटना घडल्या कि त्यांचे कनेक्शन हैदराबादमध्ये सापडते. हैदराबादमधील काही संघटनांचे दहशवाद्यांशी संबंध आहेत. त्यांना नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. दरम्यान, अन्य २५ शहरांची नावे बदलण्याचा प्रस्ताव भाजपच्या विचारधीन असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हैदराबादमध्ये दहशतवादी कारवायांना वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

मी अपक्ष लढणार नाही, कालिदास कोलंबकरांचे पक्षबदलाचे संकेत

News Desk

फक्त ५९ मिनिटांमध्ये मिळणार कर्ज, पंतप्रधान मोदींची घोषणा

Gauri Tilekar