HW News Marathi
राजकारण

राम मंदिर प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसचा हस्तक्षेप !

अलवर | राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेपामुळे विलंब होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत आयोजित केलेल्या सभेत मोदी बोलत होते. तसेच काँग्रेस नेत्यांनीच सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिराची सुनावणी टाळण्याची अपील केली होती, असाही आरोप मोदींनी केला. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिकेमुळे सध्या अयोध्येतील आणि देशातील वातावरण चांगलेच तापले आहे.

अलवर येथील रॅलीमध्ये मोदी म्हणाले, अयोध्येचा खटला सुरू होता तेव्हा काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा सदस्य म्हणाले की, राम मंदिराचा खटला २०१९ पर्यंत चालवू नका, कारण २०१९ मध्ये निवडणुका आहेत. देशातील न्यायव्यवस्थेला अशा प्रकारच्या राजकारणामध्ये योग्य आहे का?” असा सवालही मोदींनी प्रचार सभेत उपस्थित केला आहे.

“सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही न्यायाधीश अयोध्येसारख्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणी न्यायदान करण्याच्या दिशेने सर्वांचे मत ऐकूण घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काँग्रेसचे राज्यसभेमधील एक खासदार आणि वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणून त्यांना घाबरवले होते. आता काँग्रेसवाल्यांनी न्यायमूर्तींना घाबरवण्याचे- धमकावण्याचे काम सुरू केले आहे,” असा आरोपही मोदींनी केला. तसेच काँग्रेसकडे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी मोदींच्या जातीचा मुद्दा समोर आणला आहे, असा आरोपही मोदींनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही !

News Desk

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

News Desk

पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, मुख्यमंत्र्यांचा पवारांना सल्ला

News Desk