HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे म्हणता म्हणजे शंकेची पाल चुकचुकतेच !

मुंबई । कार्तिक एकादशीला काहीजण पाऊस पडू दे म्हणतात. परंतु सभागृहनेते चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच शंकेची मनात पाल चुकचुकू लागली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे जो अहवाल असेल तो पटलावर ठेवावा. जर ठेवला नाही तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला दिला आहे.

आमची सर्व विरोधी पक्षाची भूमिका हिच आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मागास आयोगाने ज्या शिफारसी दिल्या आहेत. त्या मुख्यमंत्र्यानी स्पष्टपणे वाचून दाखवल्या नाहीत. मागास आयोगाच्या शिफारसी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली. २९३ चा प्रस्ताव हा सरकारचा अभिनंदन करणारा आहे. परंतु आमचा त्याला विरोध आहे. फिल्डवर ज्या अडचणी लोकांना येतात ते वास्तव आम्हाला सभागृहामध्ये मांडायचे आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु त्यामध्ये अनेक तालुक्यांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यासर्व गोष्टी आम्हाला सरकारच्या लक्षात आणून द्यावयाच्या आहेत. आज सकाळपासून आम्हाला सभागृहामध्ये ही चर्चा करायची होती परंतु मुख्यमंत्री सभागृहात आलेले नाहीत. हे आमच्या डोक्यावर यांचे खापर फोडतील म्हणून आम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजेत. त्यामुळेच मी सभागृहात वक्तव्य केल्याचा खुलासा अजितदादा पवार यांनी केला.

मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे…

सभागृहामध्ये नुसती वांजोळी चर्चा करून काही फायदा नाही. मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे. आम्ही म्हणतोय टीसचा अहवाल पटलावर ठेवा. त्यामुळे त्यात काय आहे ते तरी कळेल. धनगड आहे की धनगर आहे हे तो अहवाल समोर आल्यावर कळणार आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदीजी ही तर जनतेची थट्टा

News Desk

जगभ्रमंती करून हाती काही नाही !

News Desk

राष्ट्रवादीत शिरूर मतदारसंघावरून पेटला वाद, विलास लांडेंचे समर्थक आक्रमक

News Desk
राजकारण

राजदंड पळवूनही सभागृह सुरु ठेवणे म्हणजे सार्वभौम सभागृहाचा अवमान । जितेंद्र आव्हाड

News Desk

मुंबई । सभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. हा एकतर राजदंडाचा अपमान आहे किंवा राज्याच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे असा आरोप माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला गेला की सभागृह बंद होते.

विरोधी पक्ष अखेरचं हत्यार केव्हा उचलतो जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा राज्यात गंभीर प्रश्न म्हणजे मुस्लिम, मराठा, धनगर आरक्षण असेल किंवा दुष्काळाच्या मुदयावर सरकार टोलवाटोलवी करते म्हटल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे जावून मागणी केली व त्यानंतर राजदंड उचलला असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सदस्य १० ते १५ मिनिटे राजदंड फिरवत राहिले. राजदंड दहा ते पंधरा मिनिटे फिरवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज तहकुब करायला हवे परंतु सभागृहाची परंपरा आणि प्रथा मोडीत काढत कामकाज रेटूत नेण्याची सरकारची मानसिकता ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे असाही आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Related posts

“वाचाळवीरांना आवरा…”, मंगलप्रभात लोढांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा टोला

Aprna

फडणवीसांच्या मराठा आरक्षण बैठकीकडे या नेत्यांनी फिरवली पाठ !

News Desk

प्रचारसभांचा खर्च सादर करावा, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

News Desk