HW News Marathi
मुंबई

घर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली पत्रे !

धनंजय दळवी | कुर्ल्यातील एचडीआयएल येथे रिकामी असलेल्या सदनिकेत माहुल प्रकल्पग्रस्तांचं लवकरात लवकर स्थलांतर करुन, आमचं जीव वाचवा. अश्या आशयाची शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना माहुल प्रकल्पग्रस्तांनी पत्रं लिहून घाटकोपर येथील भटवाडी पोस्ट ऑफिस येथे पोस्ट करण्यात आले.

गेल्या रविवारी माहुल प्रकल्पग्रस्तांनी सुरक्षित घरांच्या मागणीसाठी मानवी साखळी रचून गृहमंत्री प्रकाश मेहतांच्या घरासमोर आंदोलन केले होते. यानंतर गृहमंत्री प्रकाश मेहता आणि माहुल प्रकल्पग्रस्तांच्या शिष्ठमंडळाची सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत कुर्ल्यातील एचडीआयएल येथे तात्पुरत्या स्वरुपात घरे देऊन या निर्णयाची ४ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं.

पण ४ दिवस उलटून सुद्धा कोणतीही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी विद्याविहार येथील आंदोलनाच्या ठिकाणापासून ते घाटकोपर येथील भटवाडी टपाल कार्यालयात मानवी साखळी तयार करुन पत्र पोस्ट केले. यात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांचा सहभाग होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk

विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे मोबाईल लंपास

swarit

Breaking News | काळबादेवी परीसरात चंद्रभवन इमारतीला आग

News Desk