HW News Marathi
राजकारण

चंद्राबाबू नायडू नंतर ममतानेही सीबीआयला रोखले

मुंबई | आंध्र प्रदेशमध्ये यापुढे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयला बोलावण्यात येणार नाही, असे आंध्र प्रदेश सरकारने स्पष्ट केले असतांना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुध्दा केंद्र सरकारला जोरदार झटका दिला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सीबीआय या तपास यंत्रणेला यापुढे आंध्रातील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही वा आंध्र प्रदेशातील पोलीसही सीबीआयच्या तपासात मदत करणार नाहीत.

सीबीआयला राज्यात मुक्त प्रवेशास बंदी करणारा गोपनीय आदेश आंध्र प्रदेश सरकारने ८ नोव्हेंबरला काढला. त्याची माहिती गुरुवारी उघड झाली. यापूर्वी तीन महिने आधीच एका प्रकरणात कारवाई करण्याची परवानगी राज्य सरकारने सीबीआयला दिली होती. मार्च महिन्यात चंद्राबाबू नायडू केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतुन (एनडीए) बाहेर पडले. त्यानंतर, चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर, केंद्र सरकारने स्वत:च्या फायद्यासाठी सीबीआयची विश्वासार्हता पणाला लावली असल्याची, अशी टीका केली होती. तर आता सीबीआय व इतर सरकारी तपास संस्था मोदी सरकारने स्वतःच्या दावणीला बांधल्या आहेत,अशी टीका ममतांनी केली आहे.

दिल्ली विशेष पोलीस कायद्यातील कलम ५ अन्वये सर्व राज्यात तपास करण्याचा अधिकार सीबीआयला असला तरी त्यातील कलम ६ अन्वये राज्य सरकारच्या संमतीशिवाय सीबीआय त्या राज्यात तपास करू शकत नाही. आंध्र प्रदेश सरकारने त्यामुळे कलम ६ अन्वये सीबीआयला रोखले आहे. त्याच कलमाच्या आधारे ममता बॅनर्जी यांनीही सीबीआयला आपल्या राज्यात कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करू न देण्याचे ठरवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उपमुख्यमंत्र्यांचा अचानक दिल्ली दौरा; मंत्रिमंडळसंदर्भात पक्षश्रेष्ठींची करणार चर्चा?

Aprna

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी घेतली पर्रीकरांची भेट

News Desk

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

News Desk
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Related posts

सुषमा स्वराज खोटारड्या आहेत, चीनचा आरोप

News Desk

मद्रास न्यायालयाने ‘टिकटॉक अ‍ॅप’वरील बंदी उठवली

News Desk

उद्या बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय निकाल देणार, आरोपींना हजर राहण्याचे आदेश

News Desk