HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेचा रविवार जम्बोब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वेचा रविवार १८ नोव्हेंबर रोजी तब्बल ६ तासांचा जम्बोब्लॉक असणार आहे. कल्याणमधील १०० वर्षे जुना पत्री पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे रेल्वेच्या सुमारे १७० फेऱ्या रद्द करण्यात येणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे. हा दिवस प्रवाशांसाठी मात्र मनस्ताप देणार ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरे मेट्रो कारशेड प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑगस्टला होणार

Aprna

सावधान मुंबईकरांनो, चायनीज गाड्यांवर निकृष्ट दर्जाचे चिकन

News Desk

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा पाठिंबा

Gauri Tilekar
राजकारण

संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणार

News Desk

संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा ११ डिसेंबर सुरु होणार असून ते ८ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. या अधिवेशना दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची गणना देखील सुरू होणार आहे.

नवी दिल्ली | संसदीय कामकाज पहाणा-या कॅबिनेट समितीने (सीसीपीए) मंगळवारी रात्री संसदेच्या हिवाळ्या अधिवेशनासंदर्भात माहिती दिली आहे. अधिवेशना संदर्भात अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील असलेल्या या सरकारचे हे शेवटचे संपूर्ण संसदीय अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीचे परिणामाची या अधिवेशनाच्या कार्यवाहीवरुन पहायला मिळतील. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी येणार आहेत.

संसदीय कामकाजमंत्री विजय गोयल यांनी ११ डिसेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत होणा-या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २० दिवस सुरु रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “आम्हाला सर्व पक्षांचे सहाय्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे. कारण, त्यामुळे अधिवेशनादरम्यान संसदेचे कामकाज उत्तम रीत्या पार पडेल.

राज्यसभेत प्रलंबित असलेल्या तीन तलाक कायद्याचे विधेयक पारीत करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. एकाच वेळी तीन बोलण्याला गुन्हा घोषित करण्यासाठी अध्यादेश जाहीर करण्यात आला होता.

संसदेचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु होते. परंतु अधिवेशन डिसेंबर महिन्यात सुरू होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा हिवाळी अधिवेशनाला विलंब झाला आहे.

Related posts

माजी मंत्री दशरथ भांडे यांचा फडणवीस सरकारला अल्टिमेटम

News Desk

कर्नाटकात अखेर भाजपचा झेंडा

News Desk

पंतप्रधान मोदी एखाद्या सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली

News Desk